वेरूळ येथील आठव्या शतकातील, हे एकाच प्रचंड खडकातून वरून खाली खणत आणलेले कैलास मंदिर (लेणे), हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील एक आश्चर्य आहेच... पण त्या मंदिराचे, त्याशिवाय अजूनही एक आश्चर्य आहे, ते म्हणजे, ते मंदिर घडवताना निघालेल्या तब्बल ४० कोटी किलोग्रॅम (!!!) दगडाचे पुढे काय झाले, हे कोणालाच माहिती नाही... हे मंदिर घडवताना काढलेला दगड वेरूळपासून काही हजार स्क्वेअर किलोमीटर परिसरात सापडत नाही... इतक्या प्रचंड आकारमानाचा दगड कुठे गेला? कोणी नेला? आणि त्याचे काय झाले? हे सर्व प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत!...
प्राचीन भारतीय अभियंत्यांनी, स्थापत्यतज्ज्ञांनी, भूगर्भशास्त्रज्ञांनी, मंदिर निर्मात्यांनी, मूर्तिकारांनी आणि कलाकारांनी, शेकडो हजारो वर्षांपूर्वी, पाश्चात्यांना तंत्रज्ञानातला ‘त’सुद्धा माहिती नसताना, नुसत्या नजरेला दिसणाऱ्याच नाहीत, तर न दिसणाऱ्यासुद्धा अक्षरशः शेकडो जागतिक आश्चर्यांचा ठेवा आपल्यासाठी मागे ठेवला आहे!...
- शरद केळकर